जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला   

नवी दिल्ली : देशात जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला आहे. जनगणना दोन टप्प्यांत होणार असून, यात जातीचाही उल्लेख केला जाणार आहे. पहिला टप्पा ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल, तर दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल.पहिल्या टप्प्यात लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या बर्फाळ प्रदेश असलेल्या राज्यांचा समावेश असेल. तर, देशाच्या उर्वरित भागात १ मार्च २०२७ पासून जनगणना केली जाईल.देशात दर १० वर्षांनी जनगणना केली जाते. शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. तर, कोरोना महामारीमुळे २०२१ मध्ये जनगणना होऊ शकली नव्हती.केंद्र सरकारने अलीकडेच जनगणनेत जातीचा समावेश करण्याबाबतचा निर्णय घेतला. त्यानुसार, यावेळी जनगणनेच्या कागदपत्रांमध्ये जातीचा रकाना समाविष्ट करण्यात आला आहे.२००१ च्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या १२१ कोटी होती. तर, २०११ च्या जनगणनेनुसार १२१ कोटी होती.

Related Articles