जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे थैमान   

शेतकरी हवालदिल

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे. पावासामुळे उन्हाळा हंगामातील पिकांची काढणी पूर्णपणे खोळबंली असून, हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या भीतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.सध्या सुरू असलेल्या पावसाने पिकांचे नुकसान झालेच, पण त्याशिवाय येणार्‍या खरीप हंगामावर सुद्धा या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू असल्याने उन्हाळ्यात केलेली मशागत वाया जाणार आहे. खरीप हंमागातील पेरण्यांसाठी हवामान कोरडे असणे आवश्यक आहे.
 
येत्या ७ ते ८ दिवसांत मान्सून पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप पेरणीसाठी पूर्व मशागत कशी करायची आणि पेरणी कशी उरकायची हा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात १०० टक्क्यांपासून अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. वेधशाळेच्या अंदाजानुसार यंदा पाऊस वेळेत सुरू होण्याची शक्यता गृहित धरून कृषी विभाागाचे बियाणे-खतांचे नियोजन केले आहे. मात्र, मान्सूनपूर्व पावसामुळे अद्याप पूर्वमशागतीची कामेच अपूर्ण असल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. 

Related Articles