भारत, पाकिस्तानातील युद्ध रोखल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा   

न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तानात शांतता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला होता, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा केला. 
भारत आणि पाकिस्तानातील संंघर्ष टोकापर्यंत जाईल आणि ते मला आवडले नसते, असे सागताना ते म्हणाले, मी संघर्ष थांबविण्याचे चांगले काम केले. आता दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करुन यापार करार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. सौदी अरेबियाचा दौरा आटोपून मायदेशी परतल्यानंतर फॉक्स न्यूजशी ते बोलत होते. दरम्यान,  दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये शस्त्रसंधी व्हावी, यासाठी प्रयत्न केले, असा दावा त्यांनी पाचव्यांदा केला. भारत सरकारने मात्र, लष्कर कारवाई महासंचालकांमध्ये झालेल्या बैठकीनुसार शस्त्रसंधी झाली असे सांगितले आहे. पण, ट्रम्प यांनी आपल्यामुळे शस्त्रसंधी आणि मोठे अणुयुद्ध टळले असून लाखो नागरिकांचे प्राण आपणच वाचवले असे पुन्हा पुन्हा सांगत आहेत.

Related Articles