रायपूरमध्ये मालमोटार अपघातात १३ ठार   

रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये रविवारी रात्री उशिरा मालमोटारींचा भीषण अपघात झाला. यामध्ये १३ जण ठार झाले. १२ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
 
खारोरा येथील बाणा बन्सारी गावातील नागरिक कौटुंबिक कार्यक्रमातून परतत असताना बांगोली येथे हा अपघात झाला. अपघातग्रस्त मालमोटारीतील नागरिक चातोदला जात होते. रविवारी रात्री उशिरा रायपूरहून येणार्‍या मालमोटारीला त्यांच्या मालमोटारीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात जवळपास ५० जण जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवले. जखमींना तात्काळ डॉ. भीमराव आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी १३ जणांना मृत घोषित केले. तर १२ जण जखमी आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 
 
मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश साई यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. 
 

Related Articles