दिल्लीत चार बांगलादेशी नागरिकांना अटक   

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील वसंत विहार परिसरात बेकायदा राहणार्‍या चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. आरिफ (१९), असदुल (३०), आसिया बेगम (४७) आणि जुहूर अली (८०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे चौघेही वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहत  होते. त्यांना हद्दपारीच्या कारवाईसाठी एका डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.
 
वसंत विहार परिसरात बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. त्यावेळी पथकाला तीन पुरुष आणि एका महिलेबद्दल माहिती मिळाली. चौकशीत त्यांनी बांगलादेशातील फुलवाडी गावचे रहिवासी असल्याचे कबुल केले. आसिया बेगम आणि जुहूर अली यांच्याकडून जप्त केलेल्या ओळखपत्रांवरून त्यांचे बांगलादेशी नागरिकत्व आणि वैध व्हिसाशिवाय भारतात बेकायदा वास्तव्य असल्याचे सिद्ध झाले आहे. चौघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर त्यांना हद्दपारी प्रक्रियेसाठी परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडे सोपवण्यात आले.

Related Articles