.तर पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून गायब करू : शिंदे   

मुंबई : युद्धविरामानंतरही पाकिस्तानने कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. पाकिस्तानने त्यांच्या कुवतीप्रमाणे वागले पाहिजे नाही तर त्यांचे नाव जगाच्या नकाशावरून कायमचे गायब करण्याची क्षमता भारतामध्ये आहे, अशी संतप्त्ा प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 
 
मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली. मात्र, तरीही पाकिस्तानकडून अधूनमधून सीमेवर गोळीबार सुरू आहे. निष्पाप नागरिकांना त्यांनी लक्ष्य केले आहे. अनेकदा युद्धविरामाचे त्यांनी उल्लंघन केले. पाकिस्तान सुधारणार नसेल तर त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले जाईल. कुत्र्याची शेपूट वाकडी राहते, तशीच प्रवृत्ती पाकिस्तानची आहे. कुत्र्याचे शूपट वाकडे असल्यामुळे ते कापले जाते. गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हेच करतील. 

Related Articles