इस्लामचा वापर करुन दहशतवादी कारवाया   

ओवैसी यांची पाकिस्तानवर टीका

नवी दिल्ली : पाकिस्तानने नेहमीच इस्लामचा मुखवटा वापरुन दहशतवादी कारवाया केल्या आहेत, अशी जोरदार टीका एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केली आहे.
 
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ओवैसी यांनी सांगितले की, की, भारतात २३ कोटींहून अधिक मुस्लिम धर्मीय राहतात. कारण त्यांच्या पूर्वजांनी द्विराष्ट्र सिद्धांत नाकारला होता.एका वृत्तसंस्थेशी बोलताना असदुद्दीन यांनी प्रश्न उपस्थित केला की, अफगाणी आणि इराणी दोघेही मुस्लिम धर्मीय देश आहेत. एकीकडे पाकिस्तान द्विराष्ट्र सिद्धांताबद्दल बोलतो आणि दुसरीकडे अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमा चौक्यांवर बाँबस्फोट का घडवून आणत आहे?’ सर्व बेकायदा कारवाया करणे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणे हे पाकिस्तानचे धोरणच आहे. पाकिस्तानने  इस्लामचा मुखवटा घातला असून तो गेल्या ७५ वर्षांपासून ते भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करत आला आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध देशात प्रथमच जबरदस्त ऐक्य दिसून आले. पाकिस्तान भारतात दुफळी माजविण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो प्रयत्न देश एकसंध असल्यामुळे फसला आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद संपवणे काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles