विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सीबीएसईकडून अनोखा उपक्रम   

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि सामाजिक-भावनिक विकास सक्षम करण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून, देशभरातील सर्व सीबीएसई संलग्न शाळांमध्ये सकाळची सभा सकारात्मक प्रतिज्ञनेने सुरू होणार आहेत. 
 
’सीबीएसईचा असा विश्वास आहे, की जर विद्यार्थ्यांनी त्यांच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी केली तर त्यांचा आत्मविश्वास, एकाग्रता आणि मानसिक संतुलन सुधारते. नियमितपणे सकारात्मक प्रतिपादनांची पुनरावृत्ती केल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, स्वतःची प्रतिमा आणि संतुलन सुधारते, असे मंडळाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. 
 
सीबीएसईने शाळांना दररोज सकाळी १-२ सोप्या, वयोमानानुसार सोईच्या  प्रतिज्ञांचा समाविष्ट करण्याचे आवाहन केले आहे. ही वाक्ये आत्मनियंत्रण, आदर आणि आरोग्याशी संबंधित असतील. प्रत्येक प्रतिज्ञापत्र इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत वाचले जाईल जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी ते समजून घेऊ शकेल आणि 
स्वीकारू शकेल.
 
प्रतिज्ञेतील विचार
 
मी नेहमीच आनंदी असतो. 
मी प्रत्येक परिस्थितीत शांत आणि स्थिर आहे.
माझी स्मरणशक्ती आणि एकाग्रता उत्तम आहे. 
मी निरोगी अन्न खातो; माझे शरीर परिपूर्ण आणि रोगमुक्त आहे. 
मी फक्त अभ्यासासाठी गॅझेट्स वापरतो. 
मी सर्वांचा आदर करतो. मी निसर्गाचा आदर करतो.

Related Articles