नवी दिल्ली : भारत पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावर ये-जा करणारी ९० उड्डाणे गुरुवारी रद्द करण्यात आली. यामध्ये ११ आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर देशातील २७ विमानतळ तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहेत. विमानतळ बंद करण्यात आल्याने या ठिकाणावर ये-जा करणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. काल दिल्ली विमानतळावर देशांतर्गत येणारी ४६ आणि जाणारी ३३ उड्डाणे रद्द करण्यात आली. यासोबतच, परदेशाला जाणारी ६ आणि येणारी ५ उड्डाणे रद्द करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Fans
Followers