दहशतवादाचे उच्चाटन होणे गरजेचे : श्री श्री रविशंकर   

मुंबई : दहशतवाद ही मानवतेविरुद्धची कृती आहे आणि त्याचे संपूर्ण उच्चाटन होणे अत्यावश्यक आहे. ज्यांना राजनैतिक मार्ग समजत नाही, त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. आपण जर देवी-देवतांचे चित्र पाहिले, तर दिसून येईल की, त्यांच्या एका हातात फुल असते आणि दुसर्‍या हातात शस्त्र. त्यामुळे या संदर्भात भारताने अतिशय समजूतदारपणे आणि विवेकपूर्वक पाऊल उचलले आहे. भारताने केवळ दहशतवादी ठिकाणांनाच लक्ष्य केले आहे. हे निश्चितच प्रशंसनीय आहे, अशी प्रतिक्रिया अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केली आहे. 
 
रविशंकर म्हणाले, दहशतवाद समूळ नष्ट केला पाहिजे. जे राजनैतिक मार्गाने ऐकत नाहीत त्यांना असेच उत्तर योग्य आहे. देशातील आणि परदेशातील भारतीयांना पुढे काय होईल याची भीती वाटत आहे. पण सर्व काही व्यवस्थित होईल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश योग्य निर्णय घेत आहे, त्यामुळे कोणीही दहशतवाद्यांची काळजी करू नये.

Related Articles