नवी दिल्ली : काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज (शनिवारी) जम्म्मू आणि काश्मीरमधील पूंछ दौर्यावर जाणार आहे. पाकिस्तानी सैन्याच्या तोफगोळा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत.राहुल यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जखमी झालेल्या व्यक्तींची भेट २५ एप्रिल रोजी श्रीनगर येथे घेतली होती. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपालांचीही भेटही घेतली होती.त्यानंतर त्यांचा दुसरा दौरा आहे, अशी माहिती सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट टाकून दिली. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला होता. तेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तातानातील दहशतवादी तळ आणि लष्करी ठाणी नष्ट केली होती. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने पूंछ परिसरात तोफगोळ्यांचा मारा केला होता. तेव्हा ८ आणि ९ मे रोजी २७ नागरिक ठार तर, ७० हून अधिक जखमी झाले होते. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची आणि जखमीची विचारपूस करण्यासाठी राहुल जात असल्याचे रमेश यांनी सांगितले.
Fans
Followers