पाकिस्तानने लक्ष्मण रेषा ओलांडू नये : मोदी   

आदमपूर हवाई तळाला भेट, जवानांचे कौतुक

जालंधर : भारतीय सैन्याने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मोठा धडा शिकविला आहे. लक्ष्मण रेषा ओलांडू नका, पुन्हा आगळीक केल्यास खबरदार, घरात घुसून मारू, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना मंगळवारी दिला.  
 
ऑपरेशन सिंदूर व भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी मंगळवारी पंजाबच्या जालंधर येथील आदमपूर हवाई दलाच्या तळाला भेट दिली. त्या प्रसंगी त्यांनी जवानांचे मनोधैर्य वाढविले. हाऊज इज जोश, असा जयघोष करत जवानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
 
९ ते १० रोजी ऑपरेशन सिंदूर कारवाई पाकिस्तानविरोधात भारतीय सैन्याने केली. तेव्हा आदमपूरच्या हवाई दलाचा तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. तसेच तेथील एस ४०० हवाई संरक्षण नष्ट केल्याचा दावा केला होता. अर्थौंत तो खोटा होाता. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी एस ४०० यंत्रणेसोबत छायाचित्र काढून ते सुरक्षित असल्याचे दाखवून दिले.
 
जवानांशी संवाद साधताना मोदी म्हणाले, भारतीय जवानांचे शौर्य अवर्णनीय आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. दहशतवादी पाकिस्तानात सुरक्षित नाहीत. तसेच भारतीयांच्या केसाला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने तिन्ही सैन्य दलाने संरक्षण केले. त्याची तोड नाही, असे सांगताना मोदी म्हणाले, चार दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले ९ दहशतवादी तळ आणि आठ लष्करी ठाणी अचूकपणे नष्ट केली. ही कारवाई अपूर्व आणि कल्पना करता येणार नाही, अशी होती. दरम्यान, आदमपूर हवाई तळ हा पाकिस्तानच्या सीमेपासून अवघ्या १०० किलोमीटवर आहे. त्याच ठिकाणी मोदी यांनी भेट दिली आणि जवानांचे मनोधैर्य वाढविले आहे. 
 

Related Articles