बलुचिस्तानात स्वातंत्र्याच्या घोषणा   

 

क्वेटा : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलूच लेखक मीर यार बलोच यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. स्वातंत्र्याची घोषणा करतानाच संयुक्त राष्ट्रांना बलुचिस्तान गणराज्याला मान्यता देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी नवी दिल्लीत बलुचिस्तानचा दूतावास सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर बलुचिस्तानच्या काही नागरिकांनी स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या. मीर यार यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,   दहशतवादी पाकिस्तानचा शेवट जवळ आला आहे. लवकरच यासंदर्भात घोषणा केली पाहिजे. आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा दावा केला आहे. आम्ही भारताला विनंती करतो की, बलुचिस्तानमध्ये आपले कार्यालय सुरु करावे. तसेच भारतात आमचा दूतावास सुरु करण्यास परवानगी द्यावी. संयुक्त राष्ट्रसंघाने बलुचिस्तान गणराज्याला मान्यता द्यावी. त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्यांची बैठक बोलवण्यात यावी. तसेच बलुचिस्तानला नोटा छापण्यासाठी आणि पासपोर्ट छापण्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या बलुचिस्तानचा भूभाग सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने शांती सेना पाठवावी, अशी मागणीदेखील त्यांच्याकडून  करण्यात आली आहे. 

Related Articles