E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
क्रिकेट कारकिर्दीचा समारोप मैदानावरच व्हावा- कुंबळे
Samruddhi Dhayagude
22 May 2025
बदलते क्रीडा विश्व,शैलेंद्र रिसबूड, डोंबिवली
सर्वात प्रथम रविचंद्रन अश्विन आणि नंतर रोहित शर्मा, पाठोपाठ विराट कोहली यांच्या निवृत्तीच्या निर्णयाने आश्चर्यचकित झाल्याची भावना व्यक्त करताना भारताचा माजी कर्णधार आणि सर्वाधिक गडी बाद करणारा फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी या सर्वांना कोहलीला अखेरचा सामना खेळण्याची संधी द्यायला हवी होती, असे मत व्यक्त केलेे. रोहित शर्मानंतर एकाच आठवड्यात विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे मला आश्चर्य वाटले. कसोटी क्रिकेटमधील दोन अनुभवी खेळाडूंनी इतक्या झटपट निवृत्त होणे खटकते. कोहली अजून क्रिकेट खेळेल, असे वाटले होते. कुठलाही खेळाडू आनंदाने निवृत्त होत नाही. निर्णय घेण्यापूर्वी त्याने खूप विचार केला असेल यात शंका नाही. त्याच्या निर्णयाचा आदर करायलाच हवा असे कुंबळे म्हणाला.
प्रत्येक खेळाडूने निवृत्ती घ्यायला हवी; पण, ती मैदानावर खेळूनच अशा मताचा मी आहे. भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांत विचित्र घडामोडी घडल्या. ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असतानाच अश्विनने निवृत्ती घेतली आणि तो मायदेशी परत आला. त्यानंतर रोहितने असाच निर्णय घेतला आणि आता कोहलीने देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले. या तिघांचे क्रिकेटमधील योगदान लक्षात घेता, त्यांना चाहत्यांसमोर अखेरच्या सामन्यात मैदानात उतरण्यासाठी संधी द्यायला हवी होती, असे स्पष्ट मत कुंबळे यांने मांडले. या दोघांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर आगामी इंग्लंडचा दौरा निश्चित कठीण असेल. रोहित निवृत्त झाल्यावर इंग्लंड दौर्यासाठी कोहली राहिल, अशी अपेक्षा होती. पाच कसोटी सामन्यांची ही मालिका आहे. या दोघांपैकी एकजण तेथे असायला हवा होता’ असेही कुंबळे म्हणाले.
कसोटी आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित आणि कोहली एकदिवसीय क्रिकेटवर कितीही लक्ष केंद्रित करणार असले, तरी विश्वचषक स्पर्धेपर्यंत त्यांची लय कायम राहिल, याची कोणी खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे पुढील विश्वचषक स्पर्धा ते खेळण्याची शक्यता कमीच असल्याचे गावस्कर म्हणाले. अर्थात, हे सगळे निवड समितीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असेल. आणखी दोन वर्षे दोघेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळ करू शकतील आणि ज्या पद्धतीने योगदान देत आहेत, तसेच दोन वर्षांनीही देतील असे निवड समितीला वाटले, तर दोघे पुढील विश्वचषक स्पर्धा खेळू शकतील, असेही गावस्कर म्हणाले.रोहित आणि विराट दोघांच्याही निवृत्तीचे मला आश्चर्य वाटले नाही. दोघांनीही स्वतःहून निवृत्ती घेतली. या दोघांच्या निवृत्तीचा विषय निवड समिती अध्यक्ष या नात्याने अजित आगरकर यांनी योग्य पद्धतीने हाताळला आहे, असे गावस्कर यांनी यावेळी सांगितले.
Related
Articles
सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा
17 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025
हिंदी सक्तीविरोधात ’मनविसे’चा आक्रोश बालभारती केंद्रात पुस्तकांवर शाईफेक
19 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
जेजुरी-मोरगाव मार्गावर अपघातात आठ ठार
19 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा
17 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025
हिंदी सक्तीविरोधात ’मनविसे’चा आक्रोश बालभारती केंद्रात पुस्तकांवर शाईफेक
19 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
जेजुरी-मोरगाव मार्गावर अपघातात आठ ठार
19 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा
17 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025
हिंदी सक्तीविरोधात ’मनविसे’चा आक्रोश बालभारती केंद्रात पुस्तकांवर शाईफेक
19 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
जेजुरी-मोरगाव मार्गावर अपघातात आठ ठार
19 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा
17 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025
हिंदी सक्तीविरोधात ’मनविसे’चा आक्रोश बालभारती केंद्रात पुस्तकांवर शाईफेक
19 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
जेजुरी-मोरगाव मार्गावर अपघातात आठ ठार
19 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त