बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला   

परतीच्या प्रवासात अर्जुनचा मृत्यू 

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे रहिवासी अर्जुन मनूभाई पटोलिया यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर तिचे अस्थी विसर्जन आणि दशक्रिया विधीसाठी अर्जुन हे लंडनहून वडिया येथे आले होते. मात्र १२ जून २०२५ रोजी एअर इंडियाच्या विमानातून लंडनला परत जात असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर आणि वाडिया गावावर शोककळा पसरली आहे.
 
अर्जुनभाई मनूभाई पटोलिया हे मूळचे अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे रहिवासी होते. ते काही वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नीचे नुकतेच लंडनमध्ये निधन झाले होते. पत्नीच्या अंतिम इच्छेनुसार, तिच्या अस्थी वाडिया येथे आणून विसर्जित करण्यासाठी अर्जुनभाई आपल्या गावी आले होते. १२ जून २०२५ रोजी एअर इंडियाच्या AI171 विमानातून ते लंडनला परत जाण्यासाठी निघाले होते.
 
दुर्दैवाने, हे विमान अहमदाबादमधील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलजवळ कोसळले. या दुर्घटनेत अर्जुनभाईंचा मृत्यू झाला. अर्जुनभाईंच्या पश्चात सुरतमध्ये राहणारी त्यांची आई आणि लंडनमध्ये राहणारी दोन मुले आहेत. आधीच मातृछत्र हरपलेल्या या मुलांना आता पितृशोक झाला आहे.
 

Related Articles