नवी दिल्ली : भारताची लोकसंख्या वर्षअखेरीस १.४६ अब्जावर पोहोचेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या नव्या लोकसंख्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. भारत तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशात सध्या ०-१४ वयोगटातील २४ टक्के, १०-१९ वयोगटातील १७ टक्के आणि १०-२४ वयोगटातील २६ टक्के तरुण आहेत. देशातील ६८ टक्के लोकसंख्या (१५-६४ वयोगट) कमावती आहे. देशात सध्या सात टक्के वृद्ध (६५ आणि त्याहून अधिक) आहेत. येत्या दशकांमध्ये वृद्धांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.
Fans
Followers