केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्रात आकडा ६०० पार   

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यापाठोपाठ गुजरातमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या मोठी आहे. राजधानी दिल्लीतही कोरोना पसरत आहे, येथे सक्रीय रुग्णांची संख्या ७०० पार पोहोचली आहे. तर महाराष्ट्रातही ६०७ सक्रीय रुग्ण आहेत. प्रत्येक राज्यात संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे.
 
केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे हजार च्या पार सक्रीय रुग्णांचा आकडा गेला आहे. गुजरातमध्ये ९८० तर त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये ७४७ रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागही ऍक्शन मोडवर असून कोविड चाचण्या वाढवल्या आहेत. तसेच लोकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत.

कोरोनामुळे किती बळी?

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२५ पासून दिल्लीत कोविडमुळे ७ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये २ जण दगावले. कर्नाटकमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या केरळमध्ये १५ जण दगावले आहेत. तर मध्य प्रदेशात २ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक तसेच राज्य आणि केंद्र सरकारने दक्षता बाळगण्याचा आणि मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

सर्वाधिक बाधित शहरे : केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्र. 

कमी बाधित शहरे : अरुणाचल प्रदेश, मिझोरम, त्रिपुरा, चंडीगड, हिमाचल प्रदेश. 

Related Articles