मुंबईतील रिक्षा चालक महिन्याला ५-८ लाख कमवतो   

‘एमबीए नाही, स्टार्टअप नाही, फक्त धावपळ’

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्र हे स्टार्टअपचे केंद्र झाले आहे. एका 'रिऍलिटी शो'मुळे देशाच्या काना कोपऱ्यातील नाव उद्योजक प्रेरणा घेऊन स्वतः:चा व्यवसाय उभारत आहेत. कोणत्याही स्वरूपाच्या व्यवसायाला केवळ मोठ्या जागा, उत्पादन भरपूर कर्मचारी दाखवण्याची गरज नसते. कधी-कधी नेमकी गरज आणि स्थळ बघून देखील व्यवसाय केला जातो. मुंबईतील एक रिक्षाचालक महिन्याला ५-८ लाख रुपये कमावत आहे. इतके उत्पन्न मिळवण्यासाठी सामान्य रिक्षाचालकाला तुलनेने खूप संघर्ष करावा लागतो. 

लेन्सकार्टचे उत्पादन प्रमुख राहुल रूपांनी यांनी त्यांच्या लिंक्डइन खात्यावर एक प्रेरणादायी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात,'' अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाबाहेर एक रिक्षाचालक तिथे आत जाणाऱ्या व्यक्तींच्या केवळ बॅग्स गाड्यांमध्ये ठेवण्याचे काम करतो. या कामातून त्याला महिन्याला ५ -८ लाख रुपये मिळतात. कोणत्याही फॅन्सी ऍप, निधी आणि फॅन्सी मार्केटिंग तंत्रज्ञानाशिवाय उत्तम व्यवसाय करता येतो.'' हा रिक्षाचालक एक बॅग ठेवण्याचे एक हजार रुपये घेतो. राहुल रूपांनी यांच्या या पोस्टमुळे रिक्षा चालक चांगलाच चर्चेत आला आहे. 
 
रुपाणी यांनी त्यांच्या व्हिसाच्या अपॉइंटमेंटची वाट पाहत असतानाचा त्यांचा अनुभव सांगितला. “सुरक्षा रक्षकाने मला सांगितले की, मी कोणत्याही प्रकारची बॅग आत नेऊ शकत नाही. तुमची बॅग लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्याची देखील सोया नाही, 'ही कृपया समजून घ्या,'” तो म्हणाला. 
 
ही हुज्जत घालताना पदपथावर उभे राहून, एका रिक्षा चालकाने एक सोपा उपाय सांगितला: “सर, बॅग दे दो. सेफ रखुंगा, मेरा रोज का है. ₹१,००० चार्जेस है.” यानंतर मला पदपथावरील 'स्मार्ट बिजनेसमन'चे गमक लक्षात आले. हा रिक्षाचालक दररोज अमेरिकेच्या दूतावासाबाहेर रिक्षा उभी करतो आणि प्रति ग्राहक ₹१,००० या दराने बॅग ठेवण्याची सेवा देतो. दररोज २० ते ३० ग्राहकांसह, रिक्षा न चालवता दररोज ₹२०,००० ते ₹३०,००० - एकूण ₹५ ते ८ लाख - कमावता येतात.
 
रुपाणी यांनी स्पष्ट केले की, “तो कायदेशीररित्या त्याच्या ऑटोमध्ये ३० बॅगा ठेवू शकत नसल्यामुळे, त्याने जवळच्या स्थानिक पोलिसांशी भागीदारी करून त्यांच्या लॉकरमध्ये सुरक्षितरित्या बॅग ठेवण्याची सोय केली आहे. जी प्रक्रिया कायदेशीर, सुरक्षित, कोणताही त्रास नसलेली आहे. रिक्षा हे फक्त साधन आहे. ”
 
सूक्ष्म निरीक्षण करून म्हटले तर महत्वाचा प्रश्न सोडविण्याचे हे मोठे कौशल्यच आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय विश्वास निर्माण करणे हे या रिक्षा चालकाचे कौशल्य वाखाण्याजोगे आहे. कायदेशीर मार्गाने जात चांगले पैसे कमविण्याची ही कल्पना  कोणत्या एमबीए केलेल्या किंवा स्टार्ट अप काढलेल्याच्या मनात देखील येणार नाही.  
 
"या प्रकारची उद्योजकता तुम्ही व्यवसायाच्या पुस्तकांमध्ये वाचत नाही पण तुम्हाला आधी विचार करता येयला हवा," असे राहुल रूपाणी यांनी पुढे म्हणाले. "खऱ्या उद्योजकतेला नेहमीच एका खास जागेची आवश्यकता नसते. कधीकधी त्यासाठी फक्त पार्किंगची जागा हवी असते."

Related Articles