मंचर,(प्रतिनिधी) : भीमाशंकर, आहुपे खोर्यात मागील काही दिवसात चांगला पाऊस झाल्याने व सध्या पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकर्यांची भात पेरणीची लगबग सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.आदिवासी भागातील शेतकर्यांचे भात हे मुख्य पीक असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आदिवासी भागातील काही प्रमाणात पाऊस झाल्याने व शेतीत भातरोपे पेरणीसाठी वापसा झालेले शेतकरी शेताची मशागत करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेतात भाताचे बी पेरताना दिसत आहे. यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाला तर आदिवासी भागातील शेतकर्यांना भात पिकातून चांगले उत्पन्न मिळेल असे शेतकरी दत्तात्रय केंगले, दिगंबर केंगले यांनी सांगितले.
Fans
Followers