सिंधू नदीच्या प्रत्येक थेंबावर पाकिस्तानचा हक्क : शहाबाज   

इस्लामाबाद : पाकिस्तानने १९६० मध्ये सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली. तेव्हापासून सिंधू नदीच्या प्रत्येक थेंबावर पाकिस्तानचा हक्क आहे. मात्र, भारत आम्हाला पाण्यासाठी दिवसरात्र धमकावतो. या युद्धापूर्वी भारत ज्या पद्धतीने धमक्या देत होता, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. आता, जर त्यांनी आणखी काही केले तर, आम्ही त्यांना धडा शिकवू, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी म्हटले आहे. शरीफ म्हणाले, भारत आम्हाला सतत धमकावत आहे. कधी गोळ्यांनी उत्तर देण्याची तर कधी पाणी रोखण्याची धमकी देतात. पण, सिंधू नदीच्या प्रत्येक थेंबावर पाकिस्तानचा हक्क आहे. 
 
मोदींच्या इशार्‍याने पाकिस्तान घाबरला‘भाकरी खा, नाहीतर माझी गोळी आहे’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाची पाकिस्तानला भीती आहे. शहाबाज शरीफपासून ते बिलावल भुट्टोपर्यंत सर्वजण या विधानाचा संदर्भ देऊन चिंता व्यक्त करत आहेत. शरीफ यांनी त्यांच्या एका भाषणात या विधानाचा उल्लेख केला होता.

Related Articles