आशासेविकांना सात महिन्यांपासून मानधन नाही   

जयंत पाटील यांचा आरोप

मुंबई, (प्रतिनिधी) : आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या आशासेविका आणि गटप्रवर्तक गेल्या सात महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी ‘एक्स’ या समाजमाध्यमातून आशासेविका आणि गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मानधनाचा मुद्दा उपस्थित केला. 
 
समाजाच्या आरोग्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलणार्‍या आशासेविका आणि गटप्रवर्तकांना गेल्या सात महिन्यांपासून मानधनच मिळालेले नाही. आशासेविका,  गटप्रवर्तक या आरोग्यसेवेच्या प्रमुख प्रवाहातील घटक आहेत. या सर्वांचे चरितार्थ त्यांना मिळणार्‍या मानधनातून चालते. त्यांच्या घरी चूल पेटणार कशी? हा विचार करण्याची संवेदनशीलता सरकारमध्ये राहिली आहे का? असा सवाल पाटील यांनी केला.. राज्यभरातील सर्व आशाताईंना न्याय मिळावा, यासाठी आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत, असे सांगितले.
 

Related Articles