रुपल चौधरीला रौप्यपदक   

गुमी : आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली. दक्षिण कोरियामध्ये भारताच्या खेळाडूंपैकी अवघ्या २० वर्षांची असणारी रुपल चौधरी हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. रुपल हिने ५२.६८ सेकंद अशी वेळ नोंदविली. आणि दुसरा क्रमांक मिळविला. तर युनुस शहा याने पुरुषांमध्ये १५०० मीटरमध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली. युनुस याने ३:४३.०३ अशी वेळ नोंदविली. 
 
तर महिलांमध्ये १५०० मीटरमध्ये पुजा हिने रौप्यपदक पटकाविले. पुजा हिने ४:१०.८३ अशी वेळ नोंदविली.तर विशाल याने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४५.५७ अशी वेळ नोंदवत कांस्य पदक मिळविले.तर पुरुषांच्या लांब उडी (ट्रिपल जंप) क्रीडा प्रकारात प्रविण चित्रावळ याने रौप्यपदक मिळविले. त्याने १६.९० मीटर लांब उडी मारली. तर यामध्ये चीनच्या झु यामिंग याने १७.०६ मीटर लांब उडी मारत सुवर्ण पदक मिळविले. 

Related Articles