E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
’सॉफ्ट पॉवर’ म्हणून चित्रपट माध्यमाचा वापर शक्य
Wrutuja pandharpure
26 May 2025
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे प्रतिपादन
पुणे
: चित्रपट हे समाजमनावर परिणाम करणारे महत्त्वाचे माध्यम आहे. सौम्य पण प्रभावी शस्त्र म्हणून (सॉफ्ट पॉवर) चित्रपट माध्यमाचा वापर शक्य आहे. हॉलिवुडने अमेरिकन सरकारच्या सहकार्याने चित्रपटांचा सॉफ्ट पॉवर म्हणून वापर प्रथम केला. त्यानंतर जगातील अनेकांनी त्याचे अनुकरण केले, असे प्रतिपादन दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शनिवारी येथे केले. काश्मीर फाईल्स, ताश्कंद फाईल्स नंतर आता मी ’बंगाल फाईल्स’मधून हाच प्रयत्न पुढे नेला आहे, असेही ते म्हणाले.
पुणे संवाद आणि सेवागुंज फाऊंडेशन आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ते ’द २.५’ फ्रंट वॉर : इंडियाज सिक्युरिटी चॅलेंजेस अँड द रोल ऑफ सिनेमा ’ या विषयावर बोलत होते. आरोह वेलणकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. याप्रसंगी पुणे संवादचे मनोज पोचट, अमित वसिष्ठ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अग्निहोत्री यांचे स्वागत करण्यात आले.
अग्निहोत्री यांनी २.५ वार, ही पाश्चात्त्य संज्ञा असून, प्रत्यक्षात आपण ३.७.५ वार लढत असल्याचा उल्लेख केला. आपल्याच देशातले काही देशद्रोही हे आपले पहिले शत्रू आहेत. इस्लाम हा आपला दुसरा शत्रू आहे. साम्यवाद हा तिसरा शत्रू आहे. शिवाय बांग्लादेश हा आपण दुर्लक्षित केलेला पण अतिधोकादायक असा शत्रू आहे. ज्याचा उल्लेख अग्निहोत्री यांनी ३.७.५ असा केला. पाकिस्तान आणि चीन हे आपले पारंपरिक शत्रू आहेत, तर बांग्लादेश हा इमर्जिंग शत्रू’ आहे, असे ते म्हणाले.
अग्निहोत्री पुढे म्हणाले, आपण प्रतिक्रिया देण्यापेक्षा आणि दुसर्याला छोटे ठरविण्यापेक्षा स्वतःची रेषा मोठी केली पाहिजे. आपल्या सर्व सामर्थ्याला इनोव्हेशनची मात्रा देण्याची गरज आहे. आपली आध्यात्मिकता नुसती गोंजारण्यापेक्षा, तिचे निर्भयतेत रूपांतर केले पाहिजे. जो आदर्श स्वामी विवेकानंदांनी आपल्याला दिला आहे. आपली प्रत्येक चांगली गोष्ट आपणच उच्चस्वरात सातत्याने सांगत राहिले पाहिजे. आपल्या कौशल्यांप्रती असलेले आपले समर्पण, हा आधुनिक युगाचा धर्म आहे.
आपण नेमके काय गमावले आहे, हे पुढच्या पिढ्यांना आपण सतत सांगितले पाहिजे, तरच अभिमान जागेल. आपण आधुनिक होण्याऐवजी पाश्चिमात्यीकरण धन्यता मानत आहोत, अशी टीकाही त्यांनी केली. अदिती कोरान्ने सूत्रसंचालन केले.
Related
Articles
हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
31 May 2025
पासपोर्ट नुतनीकरणासाठी केजरीवाल न्यायालयात
30 May 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
लोकांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम रूप
28 May 2025
वीज खंडीत झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत
27 May 2025
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
31 May 2025
पासपोर्ट नुतनीकरणासाठी केजरीवाल न्यायालयात
30 May 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
लोकांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम रूप
28 May 2025
वीज खंडीत झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत
27 May 2025
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
31 May 2025
पासपोर्ट नुतनीकरणासाठी केजरीवाल न्यायालयात
30 May 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
लोकांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम रूप
28 May 2025
वीज खंडीत झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत
27 May 2025
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
31 May 2025
पासपोर्ट नुतनीकरणासाठी केजरीवाल न्यायालयात
30 May 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
लोकांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम रूप
28 May 2025
वीज खंडीत झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत
27 May 2025
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
राज्यात मुसळधार
5
बांगलादेशातील अस्थिरतेमागे भारत
6
श्रीगोंदे तालुक्यात ढगफुटी