केरळ नव्हे ‘हे’ राज्य आहे संपूर्ण साक्षर   

ऐझॉल : आता पर्यंत सर्वाधिक साक्षरांची संख्या असलेले राज्य म्हणून केरळ आपल्याला माहीत आहे. पण हा विक्रम आता एका छोट्याश्या राज्याने बदलला आहे. भारताला पहिले पूर्ण साक्षर राज्य मिळाले आहे. भारताच्या नकाशावर ईशान्य दिशेला असलेले मिझोराम हे राज्य पूर्ण साक्षर राज्य ठरले. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने या संदर्भातील अधिकृत माहिती एक्स पोस्ट करून सांगितली. 
 
शिक्षण मंत्रालयाने एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, आज, उल्लास (ULLAS) नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मिझोरामला अधिकृतपणे पूर्ण साक्षर राज्य घोषित केले जाणार आहे. उल्लेखनीय कामगिरी करणारे भारतातील हे पहिले राज्य ठरले आहे. माननीय शिक्षण राज्यमंत्री आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ऐझॉल येथे होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहतील. मिझोरामचे माननीय मुख्यमंत्री पु लालदुहोमा यांच्यासह इतर मान्यवर ही घोषणा करतील.

Related Articles