महागाई, करवाढीचा जनतेवर दुहेरी मारा : जयराम रमेश   

नवी दिल्ली : गगनाला भिडणारी महागाई आणि करवाढ अशा दुहेरी मार्‍याला जनता सामोरे जात आहे. सर्वसामान्य जनतेचा यामध्ये कसा निभाव लागणार, याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे, असे काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे.  
 
जयराम रमेश यांनी समाजमाध्यमावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, गेल्या दहा वर्षांत महागाई आणि कराचा बोजा सातत्याने वाढला आहे. वैद्यकीय आणि शिक्षणावरील खर्चात दरवर्षी १२ ते १५ टक्क्यांनी वाढ होत आहे. शाळेची फी, पुस्तके, गणवेश हे सर्व महाग झाले आहे. बँका छोट्या सेवांसाठीही शुल्क आकारत आहेत. नेट बँकिंगवरही टॅक्स आहे.  नागरिकांचे उत्पन्न वाढत नाही; कर आणि वाढती महागाई जनतेला जगू देत नाही.वाढत्या किंमती, खासगी गुंतवणुकीत घट आणि स्थिर वेतन या समस्यांचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे.

Related Articles