पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक   

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी कारवाईच्या महासंचालकांमधील (डीजीएमओ) नियोजित चर्चेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उच्चस्तरीय बैठक घेतली.या बैठकीस संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर, पंतप्रधान मोदी लष्करी अधिकारी आणि प्रमुख मंत्र्यांच्या नियमित बैठका घेत आहेत.
 
भारताने ७ मे रोजी पहाटे पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवली. त्यानंतरही, पाकिस्तानच्या कुरापती सुरूच राहिल्या. त्यामुळे, भारताने कराची, लाहोरसह अनेक महत्त्वाच्या शहरांवर प्रत्युत्तरात हल्ले केले. यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले.पाकिस्तानच्या लष्करी कारवाईच्या महासंचालकांनी भारतातील समकक्ष अधिकार्‍यांशी संवाद साधला अणि सशस्त्र हल्ले थांविण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. त्याचाच पुढचा भाग म्हणून काल उभय अधिकार्‍यांमध्ये बैठकीचे आयोजन केले होते.

Related Articles