सिंधू करार? तुमचे तुम्ही पहा...   

जागतिक बँकेची पाकिस्तानला थप्पड 

वॉशिंग्टन : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाईचा बडगा उगारत सुरूवातीला सिंधू पाणी करार स्थगित केला होता. त्यावर आता पाकिस्तानने जागतिक बँकेकडे अपील केले. मात्र, जागतिक बँकेने पाकिस्तानला फटकारलेे. सिंधू करार? तुमचे तुम्ही पहा,  आम्ही काहीही करु शकत नाही, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. 
 
जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा म्हणाले, आमची भूमिका फक्त मध्यस्थीची आहे. जागतिक बँक ही समस्या कशी सोडवेल याबद्दल बरीच अटकळ आहे;   परंतु हे सर्व निरर्थक आहे. जागतिक बँकेची भूमिका केवळ मध्यस्थाची आहे.पंतप्रधान मोदींनी आधीच घोषणा केली आहे की, भारताच्या हक्काचे पाणी आता भारतासाठीच वापरले जाईल. सिंधू करार स्थगित केल्यानंतर भारत आता पाकिस्तानला हे सांगण्यास बांधिल नाही, की तो हे पाणी कधी सोडेल आणि कधी बंद करेल. गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातून काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडे असल्याचे दिसून आले आहे. चिनाब नदीवर असलेल्या या धरणातून पाकिस्तानकडे वाहणारे पाणी भारताने आधी नियंत्रित केले होते आणि नंतर ते सोडले.इकडे भारताने ’ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यापासून पाकिस्तान आणखीनच बिथरला आहे. भारतात हल्ला करण्याचा तो सातत्याने प्रयत्न करत आहे; परंतु त्यांचे प्रयत्न वारंवार अयशस्वी ठरत आहेत.

Related Articles