दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला   

कानपूर विभागातून देवदत्ता माझी अव्वल

जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल 
 
नवी दिल्ली : जेईई अ‍ॅव्हान्स आयआयटी प्रवेश परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यात दिल्ली विभागातून रजित गुप्ता याचा पहिला क्रमांक आला असून विद्यार्थिनींमध्ये देवदत्ता माझी पहिली आली. 
 
आयआयटी कानपूरच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, जेईईची संयुक्त प्रवेश परीक्षा आयोजित केली होती. १८ मे रोजी १ लाख ८० हजार ४२२ जणांनी परीक्षेचे दोन्ही पेपर दिले.  त्यापैकी ५४ हजार ३७८ उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ९ हजार ४०४ महिला उमेदवार होत्या. दरम्यान, रजित गुप्ता हा राजस्तानातील कोटाचा रहिवासी आहे. त्याने ३६० पैकी ३३२ गुण प्राप्त केले. सर्वसामान्य गुणवत्ता यादीत तो पहिला आला. आयआयटी कानपूर विभागातून विद्यार्थिनी देवदत्त माझी गुणवत्ता यादीत १६ व्या क्रमांकावर असून तिने ३१२ गुण मिळविले. जेईई मेन्स प्रवेश परीक्षा ही अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी देशभरात घेतली जाते. त्यामध्ये उत्तीर्ण होणारे जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरतात.  ११६ परदेशी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात १३ जण पात्र ठरले. 
 
पहिल्या १०० उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुंबई आणि दिल्ली विभागातील प्रत्येकी ३१ जण होते. २३ जण आयआयटी हैदराबादचे तर कानपूर विभागातील चार होते. आयआयटी खरगपूरचे पाच आणि रुरकीचे सहा जण आहेत. 

Related Articles