E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वेगवेगळ्या उपायांनी मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ कमी करणे शक्य
Samruddhi Dhayagude
27 May 2025
पुणे बालपुस्तक महोत्सवातील परिसंवादात सूर
पुणे : स्क्रीनवर मिळणारा तात्पुरता आनंद टाळून मुलांनी दीर्घकालीन आनंददायक पर्याय स्वीकारावेत. वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे आणि घरगुती वस्तूंचा वापर करून मुलांना गुंतवून ठेवता येते. त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम कमी करणे शक्य आहे, असा ठाम सूर पुणे बालपुस्तक महोत्सवात आयोजित ‘स्क्रीन टाइमचा राक्षस’ या परिसंवादात उमटला.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडा मंच येथे हा परिसंवाद पार पडला. यामध्ये लेखिका स्मिता पाटील वळसंगकर, शिक्षणतज्ज्ञ अर्चना कुडतरकर आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. श्रुती पानसे यांनी सहभाग घेतला. परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रसाद मिरासदार यांनी केले.
स्मिता पाटील वळसंगकर म्हणाल्या, स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी सर्वप्रथम कुटुंबातील सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत. मुले खेळली, अभ्यास केला आणि झोप पूर्ण झाली, कीच स्क्रीन वापरणे योग्य ठरेल. झोपेपूर्वी एक तास स्क्रीनपासून दूर राहणे, जेवणावेळी मोबाईल आणि टीव्ही टाळणे, कुटुंबासोबत गप्पा मारणे, वाचन करणे किंवा एकत्र खेळणे असे पर्याय स्वीकारल्यास स्क्रीनपासून दूर राहता येते.
अर्चना कुडतरकर म्हणाल्या, मुलांनी ‘कंटाळा आलाय’ असे सांगितले की, पालकांनी त्याचा सकारात्मक अर्थ लावावा. कारण हेच वाक्य मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याची संधी असते. अशावेळी चित्रकला, कोडी, हस्तकला, वाचन असे विविध उपक्रम राबविता येतात.
डॉ. श्रुती पानसे यांनी सांगितले की, मोबाईल गेम्स हे अतिशय हुशारीने डिझाइन केलेले असतात. मुलांची आवड, रंगसंगती, संगीत याचा विचार करून ती तयार केली जातात. त्यामुळे मुले त्यात सहज अडकतात. मात्र, सतत गेम खेळल्याने मेंदूची निर्णय क्षमता कमी होण्याचा धोका असतो. म्हणूनच, मोबाईलवरील गेम्स मर्यादित वेळेत खेळून बाजूला ठेवायला शिकवणे गरजेचे आहे. पालकांच्या सक्रिय सहभागाने आणि योग्य मार्गदर्शनाने मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवणे शक्य असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे अत्यावश्यक असल्याचा सूर परिसंवादात उमटला.
Related
Articles
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !