पार्किंग असेल तरच वाहन खरेदी...   

राज्य वाहतूक मंत्री सरनाईक यांची नवी योजना 

मुंबई : पुणे-मुंबई सारख्या सर्व शहारात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसते. दिवसेंदिवस पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावर उपाय योजना म्हणून महाराष्ट्र सरकारने आता आधी वाहन लावणार कुठे हे दाखवा मगच गाडी घ्या असे नियम काढला आहे. नव्या वाहनांची नोंदणी करण्यासाठी संबंधित महापालिकेकडून मिळालेल्या पार्किंग जागेच्या प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे. 
 
राज्याचे वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले,'' मुंबई महानगर प्रदेशात () पार्किंगचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे आता जी व्यक्ती वाहन खरेदी करेल, त्याने त्यावाहानासाठी पार्किंगची सोय असल्याचे प्रमाणपत्र महापालिकेकडून घेणे बंधनकारक असेल. अन्यथा वाहनांची नोंद केली जाणार नाही. ''
 
सरकारने राज्यात नवीन पार्किंग धोरण लागू करण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी बैठक घेतली आहे. सरनाईक म्हणाले, ''विकास नियमांचे पालन करून इमारतींसोबत पार्किंगची सोय करणे बंधनकारक केले जाईल. बिल्डरने फ्लॅट सोबत पार्किंगची जागा देणे आवश्यक असेल. ''
 
नागरी विकास विभाग मनोरंजनासाठी राखून ठेवलेल्या जागांच्या खाली पार्किंग प्लाझा उभारण्याच्या प्रस्तावावर काम करत आहे. यामुळे भविष्यात शारांत होणाऱ्या पार्किंगच्या अडचणी कमी होऊ शकतात, असेही सरनाईक यांनी सुचविले. 
 
राज्यातील अत्याधुनिक वाहतूक पर्यायांवर देखील प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले,''मी नुकतेच वडोदऱ्याला गेलो होतो. तेथे जगातील पहिली व्यावसायिक सस्पेंडेड पॉड कार ट्रान्सपोर्ट यंत्रणा सुरू होणार आहे. याच धर्तीवर मीरा भाईंदर आणि बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पॉड टॅक्सी प्रकल्प राबविण्याचा विचार आहे. यामुळे मेट्रोची जोडणी सोपी होईल. 
 

Related Articles