पाकिस्तान कर्जाचा वापर दहशतवादासाठी करेल : राजनाथ   

नाणेनिधीने फेरविचार करण्याची मागणी

भूज : पाकिस्तान एक अब्ज डॉलर्सच्या कर्जाचा वापर दहशतवादासाठी करेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी केली.     
 
जम्मू आणि काश्मीरच्या बदामी बाग हवाई तळाला भेट दिल्यानंतर काल त्यांनी गुजरातच्या भूजमधील हवाई दलाच्या तळाला भेट दिली. त्यांनी जवानांशी संवाद साधले. ऑपरेशन सिंदूरमधील जवानांच्या भरीव योगदानाचे कौतुक केले. या प्रसगी त्यांनी पाकिस्तानच्या आर्थिक दहशतवादावर बोट ठेवले. ते म्हणाले, पाकिस्तानला नाणेनिधीने १ अब्ज २३ कोटी डॉलर्स कर्ज दिले आहे. मात्र, त्याचा विनियोग चांगल्या कामासाठी करण्याऐवजी दहशतवादासाठी केला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नाणेनिधीने ाकर्जाचा  फेरविचार करण्याची गरज आहे. पाकिस्तानचा दहशतवाद  केवळ भारतीय उपखंड किंवा आशियापुरता मर्यादित नाही. तो जागतिक दहशतवादाचा केंंद्रबिंदू आहे. त्याला आता वेसण घालण्याची गरज निर्माण झाली आहे 

ही तर झलक, चित्रपट अजून बाकी

भारतीय सैन्य दलाच्या कारवाईचे कौतुक करताना राजनाथ सिंह म्हणाले, जवानांच्या पराक्रमामुळे ऑपरेशन सिंदूरला यश मिळाले आहे.दहशतवाद्यांविरोधातील कारवाई सुरूच राहणार आहे. पाकिस्तानचे हवाई दलाचे ११ तळ आणि आठ दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने आक्रमक कारवाई करुन ते बेचिऱाख करुन टाकले आहेत. दहशतवाद पोसणार्‍या पाकिस्तानला भारताने धडा शिकविला आहे. कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्याचे कंबरडे मोडले आहे. ही तर सुरुवात आहे. कारवाई एक झलक असून चित्रपट बाकी आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. 

ब्रह्मोस पाकिस्तानसाठी कर्दनकाळ

भारतीय सैन्याची भात्यातील प्रमुख अस्त्र ब्रह्मोस क्षेपणास्त्र ठरले आहे. अवघ्या २३ मिनिटांत १५ ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या सैन्याची दाणादाण उडवून दिली. सैन्य तळ आणि दहशतवादी तळ बेचिराख केले. 

Related Articles