मला शिकवू नये : गौतम गंभीरचा हल्लाबोल   

मुंबई : माझी कोचिंग, रेकॉर्ड आणि बक्षिसाच्या रक्कम या सर्व गोष्टींबाबत त्यांनी सवाल केले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षिसावर सवाल केले. मला देशाला हे सांगण्याची गरज नाही की, मी पैसे कुठे सोडले आहेत. मात्र, देशाला हे माहिती असायला हवे की, असे गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात रहात आहेत. देशातून पैसा कमावतात. बाहेर घेऊन जातात. मी ११-५५ ला सेक्युरिटी चेक करत नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय राहिन. टॅक्स वाचवण्यासाठी एनआरआय बनणार नाही, असं भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला. तो एका मुलाखतीत बोलत होता. यावेळी गौतम गंभीरने कॉमेंट्रीतून त्याच्यावर टीका करणार्‍यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 
 
गौतम गंभीर म्हणाला, मी प्रशिक्षक होऊन केवळ आठ महिने झाले आहेत. रिझल्ट आले नाहीत तर आणि टीका केली तर मला काहीच हरकत नाही. तसं घडलं तर लोकांचं काम आहे की, माझ्यावर टीका करणे. मात्र, काही असेही लोक आहेत, जे २०-२५ वर्षांपासून कॉमेंट्री बॉक्समध्ये बसले आहेत. त्यांनी माझ्या प्रत्येक गोष्टीवर सवाल केले. त्यांना वाटतं की, भारतीय क्रिकेट त्यांच्या घरची जहागीर आहे. मात्र, भारतीय क्रिकेट कोणाच्या घरची जहागीर नाही. क्रिकेट १४० कोटी भारतीयांची ओळख आहे आणि ती तशीच राहिल. 
 
पुढे बोलताना गौतम गंभीर म्हणाला, मी प्रशिक्षक म्हणून माझी जबाबदारी पार पाडली आहे. संघाच्या कामगिरीवर मला मागील १० महिन्यांपासून प्रत्येक दिवशी जज केलं जात होतं. त्यावेळी काही लोकांनी टीका केली, तर काही लोकांनी कौतुक केलं. चढ-उतार नक्कीच येत असतात. मला ते चांगलं माहिती आहे. देशाला अभिमान वाटावा, असं काहीतरी करणे हेच माझं काम आहे. 

Related Articles