बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित   

अमरावती : शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करणारे प्रहार संघटनेने अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर सातव्या दिवशी आपले आंदोलन स्थगित केले आहे.बच्चू कडू यांनी शेतकर्‍यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर अन्न त्याग आंदोलन सुरू केले होते. त्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळू लागल्याने सरकार अस्वस्थ होते. शुक्रवारी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. 
 
यावेळी शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल, या समितीमध्ये बच्चू कडू हे देखील असतील, या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेऊ असे आश्वासन फडणवीस यांनी कडू यांना दिले होते. त्यानंतर शनिवारी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री उदय सामंत यांनी राज्य शासनाच्या वतीने आज बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी सामंत यांनी कडू यांच्या प्रश्नाबाबत राज्य शासन गंभीर असल्याचे सांगितले. या प्रश्नांवर शासन कार्यवाही सुरू करील असे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

Related Articles