E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार
Wrutuja pandharpure
11 May 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; ७०१ कोटींचा आराखडा तयार
आळंदी
: प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, ज्ञानपीठ तयार करण्यासाठी ७०१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला शांतीब्रम्ह मारुती महाराज कुरेकर, आमदार उमा खापरे, शंकर जगताप, बाबाजी काळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ, अॅड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, अॅड. रोहर्णी पवार, पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.
ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे हे ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानाही असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्ञानपीठ तयार करण्यासाठी ७०१ कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल. इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसह ३९ गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत जाईल. इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पुजनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
शांतीब्रम्ह मारुती महाराज कुरेकर यांनी भागवत धर्म प्रचारासाठी केलेले कार्य लक्षात घेता यांना पद्म पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. संतांची ही मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे कार्य संतांनी केले. वारकारी संप्रदायने रुजविलेल्या परंपरेमुळे राज्य अग्रेसर आहे. भौतिक प्रगतीमुळे शांती मिळत नाही तर मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. संत परंपरेमुळे, त्यांनी दिलेल्या अध्यात्मिक विचारमुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. प्रत्येक गावातील भागवत सप्ताहामुळे हा विचार सर्वदूर पोहोचविण्यास मदत होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
वारकरी संप्रदायामुळे भागवत धर्म जिवंत
देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. त्यामुळे आपला विचार, संस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकला नाही. परकीय आक्रमणाच्यावेळी संत समाजात सुविचार रुजवत होते. त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू आहे.
Related
Articles
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
वृक्षाथॉन मॅरेथॉनमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
31 May 2025
मध्य प्रदेशात भीषण अपघातात ९ ठार; दोन जखमी
05 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा महत्वाचा कणा
02 Jun 2025
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
वृक्षाथॉन मॅरेथॉनमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
31 May 2025
मध्य प्रदेशात भीषण अपघातात ९ ठार; दोन जखमी
05 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा महत्वाचा कणा
02 Jun 2025
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
वृक्षाथॉन मॅरेथॉनमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
31 May 2025
मध्य प्रदेशात भीषण अपघातात ९ ठार; दोन जखमी
05 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा महत्वाचा कणा
02 Jun 2025
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
वृक्षाथॉन मॅरेथॉनमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
31 May 2025
मध्य प्रदेशात भीषण अपघातात ९ ठार; दोन जखमी
05 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा महत्वाचा कणा
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर