E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तह्व्वूर राणाच्या कोठडीतआणखी १२ दिवसांची वाढ
Samruddhi Dhayagude
28 Apr 2025
दिल्लीच्या एनआयए विशेष न्यायालयाचा आदेश
मुंबई : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा याच्या कोठडीत आणखी १२ दिवसांची वाढ करण्याचा आदेश दिल्ली न्यायालयाने सोमवारी दिला.
एनआयएच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रजित सिंह यांनी एनआयएच्या विनंतीनुसार राणाच्या कोठडीत वाढ केली. राणाची १८ दिवसांची कोठडीची मुदत काल संपली होती. त्यामुळे एनआयएने ती वाढवून देण्याची विनंती केली होती. राणाला अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आणि तोंड झाकून न्यायालयात हजर करण्यात आले. ज्येष्ठ वकील दयान कृष्णन आणि विशेष सरकारी वकील नरेंद्र मान यांनी एनआयएच्या बाजू मांडली. दिल्ली कायदा सेवा विभागाचे वकील पियूष सचदेवा हे राणाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.
गेल्या वेळी कोठडी सुनावताना राणा याची प्रत्येक २४ तासाला वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने एनआयएला दिले होते. तसेच एक दिवसाआड वकिलांना भेटण्याची अनुमती दिली होती. तेव्हा एक लेखणी वापरण्याची परवानगी राणाला दिली. तसेच संभाषण ऐकता येईल, एवढ्या अंतरावर एनआयए अधिकार्यांनी उभे राहावे, अशी सूचना केली होती.
सुनावणीवेळी कोठडी मागण्याची कारणे देखील एनआयने दिली होती. त्यात दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान कसे रचले ? याचा शोध घेण्यासाठी तसेच हल्ल्यापूर्वी राणा कोठे गेला? याचा तपास करायचा होता.श त्यासाठी त्याला त्या त्या ठिकाणी घेऊन जायचे असल्याचे कारणही दिले होते.
https://twitter.com/AHindinews/status/1916813188500476227
दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान रचणारा पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमन हेडली याचा राणा हा प्रमुख साथीदार, मित्र आहे. तो कॅनडाचे उद्योगपती, अमेरिकेचा नागरिक आणि पाकिस्तानी लष्कराचा माजी कप्तान देखील आहे. राणाला अमेरिकेच्या न्यायालयाच्या आदेशानुसार ४ एप्रिल रोजी भारताकडे सोपविले होते. २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हेडली आणि राणा यांनी रचलेल्या कारस्थानानुसार भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. रेल्वेस्थानकात, दोन आलिशान हॉटेल आणि ज्यू धर्मीय प्रार्थनास्थळावर बेछूट गोळीबार केला होता. हल्ल्यात १६६ नागरिकांचा बळी गेला होता. सुमारे ६० तास दहशतवादाचे तांडव मुंबईत सुरू होते.
Related
Articles
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सीबीएसईकडून अनोखा उपक्रम
11 May 2025
अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई
14 May 2025
व्यापार युद्धाचा चीनला फटका
11 May 2025
बलुचिस्तानात स्वातंत्र्याच्या घोषणा
10 May 2025
शस्त्रसंधी कोणाच्या दबावाखाली?
12 May 2025
ताडोबा अभयारण्यात नयनतारा वाघिणीवरून संघर्ष पेटला
16 May 2025
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सीबीएसईकडून अनोखा उपक्रम
11 May 2025
अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई
14 May 2025
व्यापार युद्धाचा चीनला फटका
11 May 2025
बलुचिस्तानात स्वातंत्र्याच्या घोषणा
10 May 2025
शस्त्रसंधी कोणाच्या दबावाखाली?
12 May 2025
ताडोबा अभयारण्यात नयनतारा वाघिणीवरून संघर्ष पेटला
16 May 2025
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सीबीएसईकडून अनोखा उपक्रम
11 May 2025
अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई
14 May 2025
व्यापार युद्धाचा चीनला फटका
11 May 2025
बलुचिस्तानात स्वातंत्र्याच्या घोषणा
10 May 2025
शस्त्रसंधी कोणाच्या दबावाखाली?
12 May 2025
ताडोबा अभयारण्यात नयनतारा वाघिणीवरून संघर्ष पेटला
16 May 2025
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सीबीएसईकडून अनोखा उपक्रम
11 May 2025
अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई
14 May 2025
व्यापार युद्धाचा चीनला फटका
11 May 2025
बलुचिस्तानात स्वातंत्र्याच्या घोषणा
10 May 2025
शस्त्रसंधी कोणाच्या दबावाखाली?
12 May 2025
ताडोबा अभयारण्यात नयनतारा वाघिणीवरून संघर्ष पेटला
16 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारत-पाक तणाव निवळणार
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका