सातारा : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे जिल्ह्यातील घाटरस्ते आता धोकादायक बनू लागले आहेत. सातार्याकडून कास पठाराकडे जाणार्या यवतेश्वर घाटातील रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली. यवतेश्वर घाट मार्गावर दरड कोसळल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. या घाट मार्गातून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या घाटातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ सुरू असते. कास, बामणोली तसेच अनेक गावांकडे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने पर्यटक आणि प्रवासी या मार्गाचा वापर करत असतात. या परिसरात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचे प्रमाण वाढत असून पर्यटक आणि स्थानिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला. दरम्यान, या ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती प्रशासनास मिळताच प्रशासनाकडून तत्काळ दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. पावसाची संततधार सुरू असल्याने घाट मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, या मार्गावर दरड कोसळल्याने पर्यटकांना कासकडे जाणारा मार्ग काही काळ बंद झाला होता तो आता पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.
Fans
Followers