आता वाळू वाहतूक २४ तास   

वाहनांना जीपीएस बसविणे अनिवार्य

मुंबई, (प्रतिनिधी) राज्यात वाळू वाहतुकीवर काही निर्बंध होते. रात्री वाहतुकीला परवानगी नव्हती. पण, ही अट सरकारने शिथिल केली आहे. सकाळी ६ ते सायंकाळी  ६ या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता २४ तास करता येणार आहे, अशी माहिती  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांना जीपीएस  डिव्हाइस बसविणे  अनिवार्य करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
सद्यस्थितीत  सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच वाळूचे उत्खनन परवानगीने होते. पण, दिवसभरात साठवलेली वाळू रात्री उचलता न आल्यामुळे वाहतूक क्षमतेचा योग्य उपयोग होत नाही. त्यामुळे अवैध वाहतूक वाढते. ही परिस्थिती बदलण्यासाठी महाखनिज  पोर्टलवरून २४ तास ईटीपी तयार करता येईल अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. वाळू वाहतुकीच्या पारदर्शकतेसाठी सरकारने  विविध उपाययोजना केल्या असून, प्रत्येक वाळूघाटाचे जिओ-फेन्सिंग केले जाणार आहे. तसेच, घाट आणि वाहतूक  मार्गांवर सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. 
 

Related Articles