मृत सहा तरुणांवर अंत्यसंस्कार   

ताम्हणी घाट अपघात 

पुणे : कोकणामध्ये पर्यटणासाठी निघालेल्या सहा मित्रांचा ताम्हिणी घाटात अपघात होवून मृत्यू झाला. तीन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर त्यांचे मृतदेह खोल दरीमधून बाहेर काढण्यात आले. पुण्यातील कोंढवे धावडे येथील हे सर्व रहिवाशी होते. त्यांच्यावर नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमी येथे गुरुवारी मध्यरात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
सहलीसाठी निघालेले तरुणांचा सोमवारी मध्यरात्री अपघात झाला. ज्या हॉटेलमध्ये निवासासाठी आरक्षण केले होते. याठिकाणी पोहचले नसल्यामुळे तीन दिवसांनंतर या अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर या तरुणांचा शोध सुरू झाला. ताम्हिणी घाटाच्या रायगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. कोंडेथर गावानंतर घाट उतरताना पहिल्याच वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन दरीत कोसळले. यामध्ये मोटारीतील सर्वच तरुणांचा मृत्यू झाला. पोलिस, बचाव पथकाच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दरीमधून बाहेर काढण्यात आले. 
 
प्रथम शहाजी चव्हाण (वय २२), पुनीत सुधाकर शेट्टी (वय २०), श्री महादेव कोळी (वय १८), साहिल सहादू गोटे (वय २४), ओंकार सुनिल कोळी (वय १८), शिवा अरुण माने (१९) सर्व राहणार कोंढवे धावडे यांचे मृतदेह पोलिसांनी गुरुवारी रात्री नातेवाईकांच्या ताब्यात दिले. अपघात अतिशय गंभीर असल्यामुळे मृतदेहांची ओळख पटणे देखील अवघड झाले होते. या घटनेमुळे कोंढवे धावडे परिसरात शोकळा पसरली होती. मृतदेहांवर नवी पेठेतील वैकुंठ स्माशानभुमी येथे गुरुवारी मध्यरात्री अत्यसंस्कार करण्यात आले. अपघातात मृत्यू झालेले सर्व तरुण हे १८ ते २५ या वयोगटातील होते. कोण होतकरुन व्यावसायिक तर कोणी नुकतेच शिक्षण पूर्ण केले होते. आयुष्याची सुरुवात आता कुठेतरी होत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles