एटीएम आणि पेट्रोल बाबत व्हायरल मेसेज खोटा   

सरकारने केला खुलासा

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार केला. या युद्धजन्य परिस्थितीत अफवांचा बाजारही जोरात सुरू झाला. एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की, पुढील २ ते ३ दिवस एटीएम बंद राहणार आहेत. त्यावर सरकारने खुलासा केला असून, असे काही होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 
 
पुढील दोन ते तीन दिवस एटीएम सेवा बंद राहणार असल्याचा जो मेसेज WhatsApp फिरतोय, तो खोटा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या 'प्रेस अँड इन्फर्मेशन ब्युरो'ने याबद्दल माहिती दिली. 

केंद्राने असा कोणताही आदेश काढला नाही

पीआयबीने स्पष्ट केले आहे की, एटीएम सेवा बंद ठेवण्यासंदर्भात भारत सरकारने कोणताही आदेश दिलेला नाही. भारतातील सर्व एटीएम नियमितपणे सुरू राहतील. त्याचबरोबर अशा प्रकारच्या फेक मेसेजपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहनही केले आहे. 

WhatsApp वरील तो मेसेज काय?

भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यानंतर WhatsApp वर अजून एक मेसेज व्हायरल होत आहे. यात असा दावा केला गेला आहे की, भारत पाकिस्तान युद्धामुळे सायबर अटॅक केल्यामुळे कदाचित एटीएम २ ते ३ दिवस बंद राहतील.
 
पाकिस्तान आणि भारत यांच्यातील लष्करी संघर्ष वाढल्यानंतर सोशल मीडियावर अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. पेट्रोल-डिझेलबद्दलही अशाच प्रकारचा मेसेज व्हायरल झाला होता. त्याबद्दल इंडियन ऑईलने सविस्तर खुलासा करत तो दावाही फेटाळला आहे. 
 

Related Articles