E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मॉकड्रिलमुळे महापालिकेच्या यंत्रणेतील त्रुटी समोर
Wrutuja pandharpure
09 May 2025
पुणे
: भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात युद्ध झाल्यास काय काळजी घ्यावी, यासाठी शहरातील अनेक भागांत मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महापालिकेत देखील ही ड्रिल आयोजित करण्यात आली होती. मात्र, या मॉकड्रिलमुळे पालिकेच्या यंत्रणेतील अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेत आपत्ती व्यवस्थापना बाबत अनेक त्रुटी असल्याने दुरुस्ती करावी लागणार आहे, तसेच पालिकेच्या आवारात यंत्रांना सतर्क करण्यासाठी सायरन नसल्याने इमारतीत अनुचित प्रकार घडल्यास सूचना देणे कठीण होऊ शकते. यासोबतच अग्निशामक यंत्रणा देखील योग्य पद्धतीने काम करत नसल्याचेही समोर आले आहे.
युद्धजन्य स्थितीत काय करावे यासाठी मॉक ड्रिल पालिका मुख्य इमारतीत येथे पार पडली. यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) नागरी संरक्षण दलाचे (सिव्हील डिफेन्स) अधिकारी उपस्थित होते. या मॉक ड्रिलमध्ये एनडीआरएफ, नागरी संरक्षण दल, अग्निशमन दल, वैद्यकीय अधिकारी, पोलीस विभाग, पालिकेचा सुरक्षा विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी योग्य समन्वय साधून मॉक ड्रील घेतली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी मॉक ड्रील बाबत सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांना सविस्तर माहिती दिली व आपत्ती परिस्थितीत कशी काळजी घ्यावी, सर्व यंत्रण यांना कसे सहकार्य करावे या बाबत मार्गदर्शन केले.
मात्र, या मॉक ड्रील दरम्यान, पालिकेत आणीबाणीच्या स्थितीत अनेक यंत्रणा काम करत नसल्याचे समोर आले आहे. पालिकेत रोज शहरांशी संबंधित अनेक कामे करण्यासाठी माजी नगरसेवक यांच्यासह शहरातील आमदार, मंत्री देखील येत असतात. तसेच सामान्य नागरिकांची देखील पालिकेत येण्याची संख्या मोठी आहे. अशा परिस्थिती पालिकेत आग लागली तर अग्निशामक यंत्रणा चोख असणे गरजचे असते. मात्र, पालिकेतील स्प्रींकल यंत्रणा काम करत नसल्याचे समोर आले आहे. तर काही भागात ही यंत्रणांच बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे आग लागली तर पालिकेत मोठी दुर्घटना होऊ शकते. तसेच एखादी दुर्घटना झाल्यास सायरन वाजवून याची माहिती इतर कर्मचारी व नागरिकांना दिली जाते. मात्र, ही सतर्क यंत्रणा देखील काम करत नसल्याचे यावेळी समोर आले. दुर्घटना झाल्यास योग्य समन्वय ठेवून नागरिकांना पालिकेच्या बाहेर काढण्यासाठी पालिकेच्या सुरक्षा रक्षाकांकडे संपर्क यंत्रणाचं नसल्याचे समोर आले. तीन वर्षांपासून वॉकी टॉकी देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही.
पालिकेत बुधवारी मॉकड्रील घेण्यात आली. यावेळी काही यंत्रणा काम करत नसल्याचे दिसून आले आहे. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी या सर्व त्रुटींची पाहणी केली जाणार असून योग्य उपाय योजना केल्या जातील.
- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
Related
Articles
केंद्र सरकारबरोबर चर्चा झाल्यानंतर आयपीएलला पुन्हा सुरुवात होणार
12 May 2025
वरातीत तलवार घेऊन नृत्य; ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा
16 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
चेकाळलेल्या वृत्तवाहिन्या आणि वावदूक समाजमाध्यमवीर!
14 May 2025
संघर्षबंदीला १८ मे पर्यंत मुदतवाढ
16 May 2025
गोळीला तोफगोळ्याने उत्तर द्या!
12 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारत-पाक तणाव निवळणार
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका