भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये ’बुलडोझर न्याय’ हा घटनेचा अपमान : रमेश   

नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील खरगोन येथे झालेल्या रामनवमी हिंसाचार प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर, काँग्रेसने मंगळवारी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला. भाजपशासित राज्यांमध्ये ’बुलडोझर न्याया’च्या नावाखाली जे काही केले जात आहे, तो घटनेचा अपमान असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला.
 
रमेश म्हणाले, ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत, त्यांना पुरेशी नुकसान भरपाई द्यावी आणि यात सहभागी असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. एप्रिल २०२२ मध्ये खरगोनमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर दुसर्‍याच दिवशी जिल्हा प्रशासनाने बुलडोझर कारवाई करून शहरातील पाच मुस्लिमबहुल भागांतील १६ घरे आणि २९ दुकाने पाडली होती. त्यावेळी मध्य प्रदेशचे तत्कालीन गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले होते, ज्या घरातून दगड फेकले गेले, त्या घरांचा दगडांचा ढिगारा केला जाईल. जयराम रमेश यांनी दावा केला की, जुलै २०२६ मध्ये मध्य प्रदेश सत्र न्यायालयाने २०२२ च्या रामनवमी हिंसाचार प्रकरणातील सर्व ११ मुस्लिम आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
 

Related Articles