शंभर टक्के शुद्धेचा दावा करणार्‍या डाबरच्या उत्पादनांवर बंदी   

अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाची कारवाई

नवी दिल्ली : मध आणि गाईच्या तुपासह डाबरच्या अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ही उत्पादने शंभर टक्के शुद्धतेच्या दाव्यांसह विकली जात होती. अन्न आणि पेयांसाठी मानके निश्चित करणारी सरकारी संस्था, एफएसएसएआय ने ही बंदी घातली आहे.भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) हे दावे दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. डाबरकडून १५ दिवसांच्या आत अहवाल मागवला आहे. सोमवार, ३ ऑगस्ट रोजी, एफएसएसएआयने समाज माध्यमाद्वारे ही घोषणा केली.
 
एफएसएसएआयच्या मते, कंपनीच्या वेबसाइटवर विकल्या जाणार्‍या खाद्य उत्पादनांवर दिशाभूल करणारे दावे आढळले आहेत. यामध्ये ’शंभर टक्के नैसर्गिक’, ’शंभर टक्के  शुद्ध’, ’शुद्धतेची हमी’, ’शंभर टक्के सेंद्रिय’ आणि ’शंभर टक्के कोवळ्या नारळाचे पाणी’ यांसारख्या लेबल्सचा समावेश होता.’एफएसएसएआयचे म्हणणे आहे की, ’शंभर टक्के दाव्यांचा हा वापर एफएसएसएआय विनियम, २०१८ चे उल्लंघन करतो. हे दावे अस्पष्ट, पडताळणी न केलेले आणि ग्राहकांना दिशाभूल करणारे आहेत.
 
’ऑरगॅनिक इंडिया’ लोगो: डाबर हिमालयन ऑरगॅनिक पल सायडर व्हिनेगर आणि डाबर ऑरगॅनिक मध या उत्पादनांवर वैध एफएसएसएआयचे ऑरगॅनिक मान्यतेशिवाय ’ऑरगॅनिक इंडिया’ लोगो असल्याचे आढळून आले.मिश्र खाद्यपदार्थांवरील खोटे दावे: डाबर होममेड कोकोनट मिल्क शंभर टक्के शुद्धता या दाव्यासह विकले जात होते. एफएसएस नियम, २०१८ नुसार मिश्र खाद्यपदार्थांसाठी असे दावे करण्यास परवानगी नाही.
 

Related Articles