केरळमध्ये पावसाचे थैमान   

आठ जणांचा मृत्यू; 13 जखमी

तिरुअनंतपुरम :  केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. आठ जणांचा मृत्यू तर, 13 जखमी झाले असून आठ जण बेपत्ता झाले आहे. पावसाने मालमत्तेचे नुकसान, दरडी कोसळणे आणि अनेक भागात पाणी साचल्याची माहिती  मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी रविवारी दिली. मुख्यमंत्री सतीशन यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले अहे की, 27 घरे उद्ध्वस्त, 196 घरांचे काहीसे नुकसान झाले. 6 हजार 793 नागरिकांना राज्यभरात उभारण्यात आलेल्या 209  मदत केंद्रात हलवले आहे. प्राण गमावलेल्या कुटुंबांना आणि ज्यांची घरे नष्ट झाली आहेत त्यांना सरकार मदतीचा हात पुढे करत असून त्यांचे जीवनमा सुधारण्यासाठी हातभार लावत आहे. दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी पर्वतीय भागांत राहणार्‍यांनी दक्षता घ्यावी, नागरिकांचे प्रतिनिधी आणि स्वयंसेवकांनी मदतकार्यासाठी पुढकार घ्यावा, असे आवाहन सतीशन यांनी केले.  महसूल मंत्री ए. पी. अनिलकुमार आणि अन्य मंत्र्यांशी संपर्क साधला असून त्यांना विविध जिल्ह्यात काम करण्यास सांगितले असून संबंधित प्रशासनाला पावसासंदर्भातील मदतकार्यासाठी संपर्क साधावा, असे सांगितले आहे. दोन दिवसांच्या तुलनेत पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागांत मदतकार्य आता वेगाने राबविता येईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.

Related Articles