E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
भीमा नदीने गाठली इशारा पातळी
Wrutuja pandharpure
02 Aug 2026
सोलापूर
, (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील पावसामुळे दौंड येथून भीमा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात शनिवारी सुद्धा 82 हजार क्युसेक वेगाने आणि वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात 40 हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी सोडण्यात आल्यामुळे पंढरपूरमध्ये भीमा नदीने इशारा पातळी गाठली आहे. यामुळे नदीकाठच्या व्यास नारायण झोपडपट्टीमधील रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. एनडीआरएफचे पथक आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज झाले आहे.
भीमा नदीच्या खोर्यामध्ये पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी दौंड येथे भीमा नदी पात्रामध्ये अद्याप 97 हजार क्युसेक वेगाने पाणी उजनी धरणामध्ये येत आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उजनी धरणांमधून पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. शुक्रवारपासून यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 82 हजार क्युसेक वेगाने भीमा नदीत सोडण्यात आले. उजनी व वीर धरणामधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर येथील भीमा नदी पात्रामध्ये तब्बल 442 मीटर पाणी पातळी झाली आहे. उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या अंदाजानुसार पंढरपूरमध्ये नदीपात्रात 443 मीटर इतकी पाणी पातळी गाठल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
Related
Articles
मेट्रोमुळे दक्षिण पुण्याच्या दळणवळणाला गती : माधुरी मिसाळ
18 Aug 2026
तृणमूलचे माजी आमदार घोष यांना जमावाकडून मारहाण
15 Aug 2026
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा
13 Aug 2026
सिंहगडावर तरूणींशी असभ्य वर्तन;तोकडे कपडे घातल्याने मारहाण
18 Aug 2026
नवभारताच्या उत्थानासाठी तरुणाई सज्ज : मुख्यमंत्री
12 Aug 2026
एमसीएच्या दुसर्या फेरीत 7 हजार 407 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
17 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा