राजकुमार पालचा संघात समावेश   

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हॉकी संघाची निवड 

नवी दिल्ली : जपानमधील आइची-नागोया येथे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या 20 सदस्यीय पुरुष हॉकी संघाची बुधवारी घोषणा करण्यात आली. विश्‍वचषकासाठी निवडलेल्या संघात केवळ एक बदल करण्यात आला असून, मिडफिल्डर राजकुमार पाल याचा समावेश करत आदित्य अर्जुन लालागे याला वगळण्यात आले आहे.
 
लालागे हा विश्‍वचषकासाठी भारताच्या 20 सदस्यीय संघात कायम आहे. हरमनप्रीत सिंह याच्याकडेच संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे. भारताचा समावेश पूल अ मध्ये यजमान जपान, दक्षिण कोरिया, बांगलादेश, श्रीलंका आणि इंडोनेशिया यांच्यासोबत करण्यात आला आहे. भारत आपल्या मोहिमेची सुरुवात 20 सप्टेंबर रोजी इंडोनेशियाविरुद्ध करेल. त्यानंतर 22 सप्टेंबरला श्रीलंका, 24 सप्टेंबरला दक्षिण कोरिया, 26 सप्टेंबरला जपान आणि 28 सप्टेंबरला बांगलादेश यांच्याविरुद्ध साखळी सामने खेळेल.
 
संघ - गोलरक्षक: मोहित एचएस, सूरज करकेरा. बचावपटू: जरमनप्रीत सिंह, हरमनप्रीत सिंह (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंह, संजय, सुमित, यशदीप सिवाच. मिडफिल्डर: राजिंदर सिंह, राजकुमार पाल, हार्दिक सिंह, मनप्रीत सिंह, नीलकांत शर्मा, विवेक सागर प्रसाद. आक्रमणपटू: दिलप्रीत सिंह, शिलानंद लाकडा, सुखजीत सिंह, मंदीप सिंह, अभिषेक.

Related Articles