E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
विदेश
इस्रायलच्या विमानांकडून रफाह सीमेवर बाँबहल्ले
Samruddhi Dhayagude
10 Feb 2024
जेरूसलेम : इस्रायलच्या लढाऊ विमानांनी शुक्रवारी गाझातील रफाह सीमा परिसरात बाँबहल्ले केले. त्यात 9 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. त्याबद्दल अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली असून असे हल्ले करू नका, असा इशारा दिला आहे.
गाझा पट्टीत इस्रायलने गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी आक्रमक हल्ले सुरू केले होते. त्यापूर्वी गाझाचा परिसर सोडावा, असा आदेश पॅलेस्टिनी नागरिकांना दिला होता. त्यानंतर एक तृतीयांश भागातून सुमारे 20 लाख 30 हजार नागरिकांनी पलायन केले होते. त्यांनी इजिप्तच्या रफाह सीमेवर आश्रय घेतला आहे. याच भागात इस्रायलने हवाई हल्ले केले आहेत. त्यात दोन इमारती कोसळून आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मध्य भागातही तिसर्या हल्ल्यात चारजण ठार झाले आहेत. तेथे रक्ताचे थारोळे साचले होते.
गाझातील हमास दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या हद्दीत हजारो रॉकेट टाकली होती. त्यानंतर इस्रायलने आक्रमक कारवाई सुरू केली. त्यात आतापर्यंत 30 हजारांच्या आसपास पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. इस्रायलचे 1 हजार 200 नागरिक ठार झाले असून दहशतवाद्यांनी 250 इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे.
दरम्यान, इस्रायलने रफाह परिसरात रात्रभर बाँबहल्ले केले. त्याचा फटका निर्वासितांना बसला आहे. त्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून नागरिकांवर हल्ले करू नका, असा इशारा दिला आहे.
Related
Articles
आरोग्य उपकेंद्राच्या उद्घाटनाला मुहूर्त कधी?
06 Feb 2025
उद्योजकांकडून वसुली करणार्यांना ‘मोकाका’ लावा
07 Feb 2025
व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांची बैठक
07 Feb 2025
वाचक लिहितात
07 Feb 2025
युक्रेनच्या अणुवीज प्रकल्पाजवळ रशियाचा हल्ला; चिंता वाढली
05 Feb 2025
राम मंदिराची पहिली वीट रचणारे चौपाल यांचे निधन
07 Feb 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
असर’च्या अहवालातून शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
2
‘करारांचा’ लाभ किती?
3
वेतन वाढेल; जबाबदारीचे काय?
4
कनिष्ठ, मध्यम वर्गाचा अपेक्षाभंग!
5
भारतीय मुलींनी जिंकला विश्वचषक
6
पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’