E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
देश
जेवढे समन्स; तेवढ्या शाळा उघडणार : केजरीवाल
Samruddhi Dhayagude
10 Feb 2024
नवी दिल्ली : मुलांना दर्जेदार शिक्षण दिल्यास एका पिढीत गरिबी दूर होईल. दर्जेदार शिक्षण देणे हे आप सरकारचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तपास यंत्रणांनी आतापर्यंत मला जेवढी समन्स दिली, तेवढ्या शाळा मी उघडणार आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
मयूर विहारमधील सरकारी शाळेच्या इमारतीची पायाभरणी केजरीवाल यांनी केली. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, मुलांना दर्जेदार शिक्षण दिल्यास एका पिढीत गरिबी दूर होईल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सातत्याने नव्या शाळा उघडत आहे. दिल्लीमध्ये आप सरकार स्थापन झाल्यापासून आम्ही अनेक उत्कृष्ट शाळा उघडल्या आहेत. अलीकडेच बुरारी, रोहिणी आणि पालमसह अनेक नवीन शाळांचे उद्घाटन करण्यात आले आहे, ज्यामध्ये दीड लाख मुलांना शिक्षण मिळेल.
नवीन शाळांमध्ये प्रयोगशाळा, लायब्ररी आणि अॅक्टिव्हिटी रूमसह सर्वोत्तम पायाभूत सुविधा असतील. सर्व मुलांना शिक्षण देण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत. दरम्यान, दिल्लीला अर्धे राज्य मानून केंद्राने आप सरकारच्या कारभारात अनेक अडथळे निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या सरकारने प्रत्येक घरापर्यंत रेशन पोहोचवण्याची योजना मांडली होती; पण केंद्राने त्याला परवानगी दिली. पण आम्ही उद्यापासून पंजाबमधील प्रत्येक घरापर्यंत रेशन पोहोचवणार आहोत. पंजाबमध्ये ही योजना सुरू झाल्यानंतर ती दिल्लीतही लागू केली जाऊ शकते आणि केंद्र ती रोखू शकणार नाही.दिल्लीतील जनतेला मोफत वीज, आरोग्य सेवा आणि शिक्षण दिले असतानाही भाजपने आम्हाला भ्रष्टाचारी ठरवले आहे, अशी खंतही केजरीवाल यांनी व्यक्त केली.
Related
Articles
वंगबंधू यांचे घर पाडल्यानंतर हसीना समर्थक रस्त्यावर
08 Feb 2025
दिल्लीची दिशा...(अग्रलेख)
07 Feb 2025
ब्रिटिशांकडून भारताची लूट
05 Feb 2025
कुनो उद्यानात दोन चित्त्यांचा जन्म
05 Feb 2025
रोईंगमध्ये महाराष्ट्राच्या मृण्मयीला रौप्यपदक
06 Feb 2025
मटारच्या दरात निम्म्याने घट
05 Feb 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
असर’च्या अहवालातून शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
2
‘करारांचा’ लाभ किती?
3
वेतन वाढेल; जबाबदारीचे काय?
4
कनिष्ठ, मध्यम वर्गाचा अपेक्षाभंग!
5
भारतीय मुलींनी जिंकला विश्वचषक
6
पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’