E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
महाराष्ट्र
भंडारा जिल्ह्यात मुसळधार
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले
अलमट्टीतून विसर्ग; पंचगंगेची पाणीपातळी घटली
मुंबई : राज्यातील भंडारा जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस पडला. पाउणी येथील वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले असून २ लाख ५० हजार युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, कर्नाटकातील अलमट्टी धरणामधून सव्वातीन लाख युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठच्या रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पाणीपातळीत एक इंचाने घट झाली आहे. सध्या पाणी पातळी ४७.७ फुटांवर आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबला आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते संभाजी घोरपेडे यांनी ह्रदयविकाराचा त्रास जाणविणार्या एका रुग्णाला भरपावसात पुराच्या पाण्यातून बोटीच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार झाल्यामुळे रुग्णाचा जीव वाचला आहे. नांदेडमध्ये एका तरुणाला पुराच्या पाण्यात दुचाकी घालणे महागात पडले. त्याची दुचाकी पाण्यातून वाहून गेली. तो मात्र बचावला. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमावर फिरली आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुयातील वाघाडी नदीला पूर आला आहे. या पुरात एका झाडावर तीन जण अडकले आहेत. ते सुटकेच्या प्रतीक्षेत होते. गडचिरोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत आहे. पार्लकोटा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे.
Related
Articles
वाहतूक नियोजनासाठी मेट्रो आवश्यक
07 Feb 2025
अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यातील सत्ता संघर्ष उघड
07 Feb 2025
पोलीस असल्याची बतावणी करून महिलेची १३ लाख ८० हजारांची फसवणूक
06 Feb 2025
विकासासाठी गाझापट्टी ताब्यात घेणार : ट्रम्प
06 Feb 2025
तिसर्या अमृत स्नानावेळी सुरक्षेत चुका नकोत
03 Feb 2025
रजपूत झोपडपट्टी एरंडवणे रस्ता रुंद होणार
08 Feb 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
असर’च्या अहवालातून शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
2
‘करारांचा’ लाभ किती?
3
वेतन वाढेल; जबाबदारीचे काय?
4
कनिष्ठ, मध्यम वर्गाचा अपेक्षाभंग!
5
पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’
6
भारतीय मुलींनी जिंकला विश्वचषक