जितेंद्र आव्हाडांची टीका

पुणे : जातीवाद पसरविणारा राज ठाकरे हा महाराष्ट्रातील एकमेव माणूस आहे. त्यांनी भोंग्याचा वाद काढला. धु्रवीकरण केले. परिणाम काय झाला, तर काकडा आरती बंद झाली. मग तुम्हीच ठरवा जातीवादी कोण? असा सवाल माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी उपस्थित केला.

काँग्रेसतर्फे आयोजित 18व्या सेवा कर्तव्य त्यात सप्ताहाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, दीप्ती चवधरी, रमेश बागवे, मोहन जोशी, वीरेंद्र कराड आदी उपस्थित होते.

आव्हाड म्हणाले, राष्ट्रवादी हा सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. राष्ट्रवादीने कधीच जातीवाद केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. अशा महाराष्ट्राच्या बापाचा अपमान होत असताना महाराष्ट्र शांत कसा? असा प्रश्‍नही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. काही लोक महाराष्ट्राचे स्वाथ्य बिघडविण्यासाठी सातत्याने छत्रपतींच्या चारित्र्यावर हल्ला करत आहेत. आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. असेही त्यांनी नमूद केले.

राहूल गांधी देशाला जोडण्यासाठी हजारो किमी चालत आहेत. इतिहासातील ही सर्वांत मोठी पदयात्रा आहे. काही लोक रथयात्रा करतात. मात्र त्याने माणूस जोडला जात नाही. राहूल गांधी गांधीजींचा मार्ग अवलंबून लोकांना जोडण्याचे कार्य करत आहेत. इतिहास पुसला गेला की, भविष्य पुसट होते. म्हणून राहूल गांधी इतिहास सांगत असल्याचेही आव्हाडांनी सांगितले. उल्हास पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

संविधान आणि काँग्रेसमुळेच देश एकसंध

संविधानाने अधिकार दिला, तर काँग्रेसने देश उभा केला आहे. काँग्रेसची भूमिका सर्वसमावेशक आहे. द्वेषाने देश कधीच जोडला जाणार नाही. देशासाठी महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधीने बलिदान दिले आहे. मतभेद विसरून विचारांची देवाण-घेवाण करणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. कोणाला संपविण्याचा विचार कधीच काँग्रेसने केला नाही. त्यामुळे काँग्रेसच देशाला एकसंध ठेवू शकतो. असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा