मतदानाला परवानगी नाहीच

मुंबई : राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत देखील अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करता यावे, यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला राज्य सभेपाठापोठ विधान परिषदेच्या निवडणुकीला देखील मोठा झटका बसला आहे. परंतु मलिक-देशमुख आपल्याला मताचा अधिकार मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करता यावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात काल सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर न्यायमुर्तींनी निकाल राखून ठेवला होता. आज दुपारी अडीच वाजता निकाल देणार असल्याचे स्पष्ट केले होते. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा अर्ज फेटाळला त्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करता येणार नसल्याचे म्हटले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा